Table of Contents
सरोजिनी नायडू यांची माहिती मराठीमध्ये(Sarojini Naidu information in Marathi ):
नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Sarojini Naidu information in Marathi बघणार आहोत. भारताची कोकिळा म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती सरोजिनी नायडू त्या अमर आत्म्याचे नाव आहे. सरोजिनी नायडू यांनी भारताच्या स्वातंत्र्यसम्राटामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. सरोजिनी नायडू या क्रांतिकारी महिलांपैकी एक महिला आहे, ज्यांनी गुलामगिरी मध्ये अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळून देण्याकरिता प्रचंड संघर्ष केला.
सरोजिनी नायडू या एक उत्तम राजकारणी आणि एक महान स्वातंत्र्य सेनानी होत्या व त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री आणि आपल्या काळातील एक वक्त्या होत्या. सरोजिनी नायडू या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या प्रेसिडेंट होत्या. त्या उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. सरोजिनी लहान मुलांच्या निसर्गाच्या ,मृत्यूच्या कविता आहेत विशेषतः लहान मुलांच्या कविता करण्यासाठी त्या फारच प्रसिद्ध होत्या.
त्यांच्या कविता वाचून अधिक लोक आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमत असतात त्यांच्या कवितांमध्ये एक खोडकरपणा आढळून यायचा त्यांच्या कवितांमध्ये लहानपणीच्या झलकी सापडायच्या आणि म्हणूनच त्यांना “भारताची कोकिळा” म्हणून ओळखले जाते. वयाच्या बाराव्या वर्षी सरोजिनी नायडू यांच्या कविता वाचून प्रत्येक आश्चर्यचकित व्हायचा.
तेव्हापासून वृत्तपत्रांमध्ये कविता आणि लेख लिहिण्यास सुरुवात केली होती. देशप्रेमाची भावना देखील त्यांच्यात भरली होती आणि म्हणून राष्ट्रीय आंदोलनादरम्यान त्या महात्मा गांधी यांच्यासोबत होत्या. महात्मा गांधींसोबत त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात सहभाग देखील घेतला. सरोजिनी नायडू यांची कन्या पद्मजा यांनी देखील स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग नोंदवला आणि त्या भारत छोडो आंदोलनाचा हिस्सा होत्या. आपण सरोजिनी नायडू यांच्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सरोजिनी नायडूंचे कुटुंब (Sarojini naidu’s family):
भारताच्या महान क्रांतिकारक सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला एका बंगाली कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चटोपाध्याय होते ते एक शिक्षाशास्त्री, डॉक्टर, वैज्ञानिक आणि शिक्षक होते हैद्राबाद येथे निजाम कॉलेजची स्थापना त्यांनी केलेली होती. पुढे त्यांच्या वडिलांना प्रिन्सिपल या पदावरून काढण्यात आले होते त्यानंतर ते नॅशनल काँग्रेस हैदराबादचे पहिले सदस्य बनले.
त्यांनी त्यांची नोकरी सोडून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली होती .स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांच्या आईचे नाव वरद सुंदरी देवी असे होते. त्या बंगाली भाषेत कविता करत असत .सरोजिनी नायडूंना एकूण आठ बहीण भाऊ होते, त्यांच्यात सरोजिनी नायडू या सर्वात मोठ्या होत्या .त्यांचा एक भाऊ वीरेंद्र नाथ चटोपाध्याय क्रांतिकारी होता त्याने बर्लिन कमिटीत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्याला 1937 मधे एका इंग्रज सैनिक आणि मारून टाकले.
सरोजिनींचे दुसरे बंधू हरिंद्रनाथ चटोपाध्याय एक प्रसिद्ध कलाकार कवी होते या व्यतिरिक्त ते नाटक सुद्धा लिहीत असे .त्यांची बहीण सुनालिनी देवी या एक उत्तम अभिनेत्री होत्या. बालपणीपासून सरोजिनी या एक हुशार विद्यार्थी होत्या त्यांना इंग्लिश, बांग्ला ,तेलुगु ,उर्दू आणि फारसी भाषेचे चांगले ज्ञान होते .वयाच्या त्या अवघ्या 12 वर्षी मॅट्रिक परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आणि मद्रास प्रेसिडेन्सीत प्रथम स्थान मिळवले.
साठी स्वतःला समर्पित करणाऱ्या महान क्रांतिकारी सरोजिनी नायडू गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावं अशी त्यांच्या वडिलांची म्हणजेच अघोरनाथ छोट उपाध्याय यांची इच्छा होती परंतु सरोजिनी नायडू यांना लहानपणीपासून कविता लिहिण्याचा फार छंद होता. कविता लिहिण्याची आवड त्यांना त्यांच्या आईकडून आली होती. बालपणी सरोजिनी नायडू यांनी चक्क 1300 ओळींची कविता लिहिलेली होती.
सरोजिनी नायडू यांचे शिक्षण (Sarojini Naidu education):
सरोजिनी नायडू यांच्या कविता आणि लिखाण प्रत्येकाला प्रभावित करत असे त्यांच्या कवितेने हैदराबाद से निजाम देखील प्रभावित झाले होते. आणि त्यांनी सरोजिनींना नायडू यांना विदेशात अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी जेव्हा सरोजिनी नायडू इंग्लंड येथे गेल्या तेव्हा त्यांनी प्रथम किंग्स कॉलेज लंडन येथे प्रवेश घेतला.
पुढे केंब्रिज च्या ग्रिटंन कॉलेजमधून शिक्षण प्राप्त केले त्या ठिकाणी त्यांची भेट त्या काळातील इंग्लिश ची प्रसिद्ध कवी अर्थन सायमन यांच्याशी झाली त्यांनी सरोजिनींना भारतीय विषयांना लक्षात ठेवत लिखाण करण्यासाठी व डेक्कन ची भारतीय कवित्री होण्याचा सल्ला त्या कवींनी दिला. त्यानंतर कवयित्री सरोजिनी नायडूंना भारतातील मंदिरे ,नद्या ,पर्वत आणि सामाजिक बाबींना आपल्या कवितांमध्ये समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे सरोजिनी भारतातील एक महान कवित्री झाल्या त्यांच्या कवितांमुळे त्यांनी लाखो लोकांच्या मनामध्ये स्थान मिळविले.
सरोजिनी नायडू यांचा विवाह (Sarojini Naidu marriage):
भारताच्या कवयित्री सरोजिनी नायडू यावेळी इंग्लंडमध्ये शिक्षण घेत होत्या त्या दरम्यान त्यांची भेट गोविंद राजूलू नायडू झाली त्याचवेळी त्या गोविंद राजुलू नायडूंच्या प्रेमात पडल्या. त्यांचे पती हे त्यावेळी इंग्लंडमध्ये फिजिशियन होण्याकरिता गेलेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतल्यावर आपल्या परिवाराच्या संमतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांचा गोविंद नायडूंची विवाह झाला. 898 मधे त्यांचा विवाह हा ब्राम्हो मॅरेज ॲक्ट अंतर्गत मद्रास येथे पूर्णपणे पार पडला.
सरोजिनी यांचा विवाह आंतरजातीय होता त्याकाळी वेगवेगळ्या जातींमध्ये लग्न होणे हे एखाद्या गुन्ह्या पेक्षा कमी समजले जात नव्हते कारण त्यावेळी आंतरजातीय विवाह समाजात मान्यता दिली जात नव्हती. हे एक क्रांतिकारी पाऊल होते याकरता त्यांना फार संघर्ष करावा लागला होता परंतु त्यांच्या वडिलांनी समाजाची चिंता न करता सरोजिनी नायडू यांना त्यांच्या निर्णयांमध्ये पूर्णपणे सहायता केली. या सर्व विपरीत परिस्थितीमध्ये त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी ठरले विवाह नंतर त्या चार मुलांचा आई झाल्या पद्मजा ,रणधीर, जयसूर्या आणि लीलामणी अशी चार मुले त्यांना झाली. सरोजिनींची मुलगी पद्मजा त्यांच्यासारखीच कवयित्री झाली. आणि ती सक्रिय राजकारणामध्ये उतरली 1961 ला पश्चिम बंगालची गव्हर्नर देखील झाली.
सरोजिनी नायडू कविता (Sarojini Naidu poem):
सरोजिनी नायडू यांच्या कवितांमधून भारताच्या संस्कृतीचे चित्र आपल्याला पहावयास मिळते. अशा महान व्यक्ती कवयित्री सरोजिनी नायडूंची भेट ज्यावेळी भारताचे स्वातंत्र्यसेनानी गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झाली तेव्हा सरोजिनी नायडू यांच्या जीवनात मोठा बदल घडला. गोखले मी सरोजिनींना आपल्या लिखाणाची ताकद स्वतंत्र्याच्या लढाईत कशी वापरावी व वापरण्याचा सल्ला दिला. गोपाळ कृष्ण गोखले यांनी सरोजिनींना आपली बुद्धी आणि शिक्षण पूर्णपणे देशाला समर्पित करणे असे सुचवले.
शिवाय ते असे देखील म्हणाले की तुम्ही क्रांतिकारी कविता लिहा आणि स्वातंत्र्याच्या या लढाईमध्ये लहान लहान भावांमध्ये लोकांना प्रोत्साहित करा जेणेकरून वर्षानुवर्षी गुलामगिरीत अडकलेले मान्य लोक मोकळा श्वास घेऊ शकतील आणि समाजात सहभागी देखील होतील. सरोजिनी नायडू यांनी गोपाळकृष्ण गोखलेंच्या या सल्ल्यावर खूप विचार केला आणि आपली व्यावसायिक लिखाण बंद करून स्वतःला राजकारणामध्ये पूर्णपणे समर्पित केले. १९०५ मधे बंगालचा विभाजना वेळी सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. विभाजनामुळे त्यापारेतीत होत्या व त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
निष्कर्ष (Conclusion):
मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण सरोजिनी नायडू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघितली. सरोजिनी नायडू या एक थोर क्रांतिकारी महिला होत्या. त्यांनी देशासाठी काय काय केली हे आपण या लेखांमध्ये बघितले. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा.
FAQs on Sarojini Naidu information in Marathi
१. सरोजिनी नायडू यांचे पूर्ण नाव काय?
सरोजिनी नायडू (पूर्वीच्या चटोपाध्याय )या एक राजकीय कार्यकर्त्या व कवयित्री होत्या. महिला मुक्ती, नागरी हक्क आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक वसाहतवादी राजवटी पासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या महत्त्वाची व्यक्ती होत्या.
२. सरोजिनी नायडू या स्वातंत्र्यसैनिक होत्या का?
सरोजिनी नायडू एक स्वातंत्र्य सैनिक बाल विचित्र आणि कवयित्री होत्या ज्यांना नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
३. भारताच्या पहिल्या राज्यपाल कोण आहेत?
सरोजिनी नायडू या भारताच्या एका भारतीय राज्याच्या पहिल्या महिला राजपाल आहेत. 15 ऑगस्ट 1947 ते 2 मार्च 1949 पर्यंत त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम केले. त्यांची मुलगी पद्मजा नायडू पश्चिम बंगालमध्ये अकरा वर्षाच्या कार्यकाळासह सर्वात जास्त काम करणारी महिला राज्यपाल आहे.